शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

मिरज पॅटर्नचा सत्ताधारी काँग्रेसला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 23:12 IST

सदानंद औंधे ।लोकमत न्यूज नेटवर्कमिरज : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरजेतील राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. मिरज पॅटर्नचा फटका काँग्रेसला बसला असून, मिरजेतील काँग्रेसच्या १४ नगरसेवकांपैकी ७ जण भाजप व राष्टÑवादीच्या वाटेवर आहेत. गत निवडणुकीत काँग्रेसला साथ देणाऱ्या मिरजेत यावेळी काँग्रेसला इद्रिस नायकवडी, सुरेश आवटी, विवेक कांबळे यांच्यासह काँग्रेसच्या अनेक माजी ...

सदानंद औंधे ।लोकमत न्यूज नेटवर्कमिरज : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरजेतील राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. मिरज पॅटर्नचा फटका काँग्रेसला बसला असून, मिरजेतील काँग्रेसच्या १४ नगरसेवकांपैकी ७ जण भाजप व राष्टÑवादीच्या वाटेवर आहेत. गत निवडणुकीत काँग्रेसला साथ देणाऱ्या मिरजेत यावेळी काँग्रेसला इद्रिस नायकवडी, सुरेश आवटी, विवेक कांबळे यांच्यासह काँग्रेसच्या अनेक माजी नगरसेवकांशीच संघर्ष करावा लागणार असल्याची चिन्हे आहेत.पालिका निवडणुकीत मिरज नेहमीच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. गत निवडणुकीत मिरजेतील २४ पैकी १४ जागा इद्रिस नायकवडी, सुरेश आवटी या मिरजेतील कारभारी नेत्यांच्या मदतीने काँग्रेसने जिंकल्या होत्या. मिरजेत यश मिळाल्याने पालिकेची सत्ता काँग्रेसला हस्तगत करणे शक्य झाले. मात्र सध्याच्या पालिका निवडणुकीसाठी नवीन प्रभाग रचनेत मिरजेतील कारभारी नगरसेवकांच्या प्रभागांचा विस्तार झाल्यानंतर राजकीय समीकरणे बदलली असून, अतहर नायकवडी, नाजिया नायकवडी, हसिना नायकवडी हे काँग्रेसचे तीन नगरसेवक राष्टÑवादीच्या वाटेवर आहेत. सुरेश आवटी, शिवाजी दुर्वे, निरंजन आवटी या काँग्रेसच्या विद्यमान नगरसेवकांसह माजी नगरसेवक महादेव कुरणे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू आहे. नगरसेविका अश्विनी कांबळे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. विवेक कांबळे, मालन हुलवान हे सुध्दा काँग्रेसपासून फारकत घेण्याची चिन्हे आहेत. यामुळे मिरजेत किशोर जामदार, संजय मेंढे, बबीता मेंढे, बसवेश्वर सातपुते, धोंडुबाई कलगुटगी, बेबीताई मालगावे एवढेच निष्ठावंत नगरसेवक शिल्लक राहणार आहेत.महापालिका निवडणुकीपूर्वी इद्रिस नायकवडी यांच्या संघर्ष समितीच्या झेंड्याखाली मिरजेतील नगरसेवकांचा दबाव गट कार्यरत ठेवण्याच्या हालचाली सुरू होत्या. मात्र संघर्ष समितीच्या झेंड्याखाली एकत्र आलेले नगरसेवक फुटल्याने संघर्ष समितीचा प्रयोग बारगळला आहे. आरक्षण व नवीन प्रभागरचनेमुळे बसवेश्वर सातपुते व मालन हुलवान यांना नवीन प्रभाग शोधावा लागणार आहे. गत निवडणुकीत मिरजेत भाजपचा एकही उमेदवार निवडून आला नव्हता. मात्र यावेळी काँग्रेसचे तीन व मनसे व राष्टÑवादीचा एक असे सहा नगरसेवक भाजपच्या गळाला लागले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत मिरजेत झालेल्या सभेत नेत्यांनी गत निवडणुकीत मिरजेत काँग्रेसला मिळालेल्या यशाचा उल्लेख केला होता. नगरसेवकांच्या गळतीमुळे या निवडणुकीत काँग्रेसला यश मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे.सर्वपक्षीय नगरसेवकांचे परस्परांशी साटेलोटेमिरजेतील नेत्यांनी महापालिकेतील सत्ताधारी नेत्यांना नेहमीच धोबीपछाड दिली आहे. मिरजेतील सर्वपक्षीय नगरसेवकांचे परस्परांशी साटेलोटे असल्याने प्रभाग समिती चार नेहमीच विरोधकांकडे राहिली आहे. प्रत्येक निवडणुकीत पक्ष बदलण्याच्या मिरजेतील कारभारी नगरसेवकांच्या मिरज पॅटर्नचा फटका मिरजेत काँग्रेसला बसण्याची चिन्हे असून, काँग्रेस उमेदवारांना माजी काँग्रेस नेत्यांशी लढत द्यावी लागणार आहे.मिरजेतील काही नगरसेवकांनी पक्षांतर केले तरी, मिरजेतील महंमद काझी व हाफिज धत्तुरे गटाची काँग्रेसला मदत होणार आहे. मिरजेत किशोर जामदार हे काँग्रेसचे नेते असले तरी, काही नगरसेवक वगळता इतरांचा त्यांच्याशी सवतासुभा आहे.कुंपणावरील नगरसेवक राष्ट्रवादीतून लढणारआ. जयंत पाटील राष्टÑवादी प्रदेशाध्यक्ष झाल्याने राष्टÑवादीला फायदा झाला आहे. इद्रिस नायकवडी गटाने राष्टÑवादीशी सख्य केले आहे. अल्लाउद्दीन काझी व जुबेर चौधरी या कुंपणावर असलेल्या नगरसेवकांनी पुन्हा राष्टÑवादीतूनच निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला थोडेफार बळ आले आहे.