शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
3
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
4
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
5
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
6
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
7
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
8
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
9
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
10
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
11
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
12
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
13
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
14
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
15
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
16
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
17
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
18
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
19
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
20
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले

मिरज पॅटर्नचा सत्ताधारी काँग्रेसला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 23:12 IST

सदानंद औंधे ।लोकमत न्यूज नेटवर्कमिरज : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरजेतील राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. मिरज पॅटर्नचा फटका काँग्रेसला बसला असून, मिरजेतील काँग्रेसच्या १४ नगरसेवकांपैकी ७ जण भाजप व राष्टÑवादीच्या वाटेवर आहेत. गत निवडणुकीत काँग्रेसला साथ देणाऱ्या मिरजेत यावेळी काँग्रेसला इद्रिस नायकवडी, सुरेश आवटी, विवेक कांबळे यांच्यासह काँग्रेसच्या अनेक माजी ...

सदानंद औंधे ।लोकमत न्यूज नेटवर्कमिरज : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरजेतील राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. मिरज पॅटर्नचा फटका काँग्रेसला बसला असून, मिरजेतील काँग्रेसच्या १४ नगरसेवकांपैकी ७ जण भाजप व राष्टÑवादीच्या वाटेवर आहेत. गत निवडणुकीत काँग्रेसला साथ देणाऱ्या मिरजेत यावेळी काँग्रेसला इद्रिस नायकवडी, सुरेश आवटी, विवेक कांबळे यांच्यासह काँग्रेसच्या अनेक माजी नगरसेवकांशीच संघर्ष करावा लागणार असल्याची चिन्हे आहेत.पालिका निवडणुकीत मिरज नेहमीच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. गत निवडणुकीत मिरजेतील २४ पैकी १४ जागा इद्रिस नायकवडी, सुरेश आवटी या मिरजेतील कारभारी नेत्यांच्या मदतीने काँग्रेसने जिंकल्या होत्या. मिरजेत यश मिळाल्याने पालिकेची सत्ता काँग्रेसला हस्तगत करणे शक्य झाले. मात्र सध्याच्या पालिका निवडणुकीसाठी नवीन प्रभाग रचनेत मिरजेतील कारभारी नगरसेवकांच्या प्रभागांचा विस्तार झाल्यानंतर राजकीय समीकरणे बदलली असून, अतहर नायकवडी, नाजिया नायकवडी, हसिना नायकवडी हे काँग्रेसचे तीन नगरसेवक राष्टÑवादीच्या वाटेवर आहेत. सुरेश आवटी, शिवाजी दुर्वे, निरंजन आवटी या काँग्रेसच्या विद्यमान नगरसेवकांसह माजी नगरसेवक महादेव कुरणे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू आहे. नगरसेविका अश्विनी कांबळे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. विवेक कांबळे, मालन हुलवान हे सुध्दा काँग्रेसपासून फारकत घेण्याची चिन्हे आहेत. यामुळे मिरजेत किशोर जामदार, संजय मेंढे, बबीता मेंढे, बसवेश्वर सातपुते, धोंडुबाई कलगुटगी, बेबीताई मालगावे एवढेच निष्ठावंत नगरसेवक शिल्लक राहणार आहेत.महापालिका निवडणुकीपूर्वी इद्रिस नायकवडी यांच्या संघर्ष समितीच्या झेंड्याखाली मिरजेतील नगरसेवकांचा दबाव गट कार्यरत ठेवण्याच्या हालचाली सुरू होत्या. मात्र संघर्ष समितीच्या झेंड्याखाली एकत्र आलेले नगरसेवक फुटल्याने संघर्ष समितीचा प्रयोग बारगळला आहे. आरक्षण व नवीन प्रभागरचनेमुळे बसवेश्वर सातपुते व मालन हुलवान यांना नवीन प्रभाग शोधावा लागणार आहे. गत निवडणुकीत मिरजेत भाजपचा एकही उमेदवार निवडून आला नव्हता. मात्र यावेळी काँग्रेसचे तीन व मनसे व राष्टÑवादीचा एक असे सहा नगरसेवक भाजपच्या गळाला लागले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत मिरजेत झालेल्या सभेत नेत्यांनी गत निवडणुकीत मिरजेत काँग्रेसला मिळालेल्या यशाचा उल्लेख केला होता. नगरसेवकांच्या गळतीमुळे या निवडणुकीत काँग्रेसला यश मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे.सर्वपक्षीय नगरसेवकांचे परस्परांशी साटेलोटेमिरजेतील नेत्यांनी महापालिकेतील सत्ताधारी नेत्यांना नेहमीच धोबीपछाड दिली आहे. मिरजेतील सर्वपक्षीय नगरसेवकांचे परस्परांशी साटेलोटे असल्याने प्रभाग समिती चार नेहमीच विरोधकांकडे राहिली आहे. प्रत्येक निवडणुकीत पक्ष बदलण्याच्या मिरजेतील कारभारी नगरसेवकांच्या मिरज पॅटर्नचा फटका मिरजेत काँग्रेसला बसण्याची चिन्हे असून, काँग्रेस उमेदवारांना माजी काँग्रेस नेत्यांशी लढत द्यावी लागणार आहे.मिरजेतील काही नगरसेवकांनी पक्षांतर केले तरी, मिरजेतील महंमद काझी व हाफिज धत्तुरे गटाची काँग्रेसला मदत होणार आहे. मिरजेत किशोर जामदार हे काँग्रेसचे नेते असले तरी, काही नगरसेवक वगळता इतरांचा त्यांच्याशी सवतासुभा आहे.कुंपणावरील नगरसेवक राष्ट्रवादीतून लढणारआ. जयंत पाटील राष्टÑवादी प्रदेशाध्यक्ष झाल्याने राष्टÑवादीला फायदा झाला आहे. इद्रिस नायकवडी गटाने राष्टÑवादीशी सख्य केले आहे. अल्लाउद्दीन काझी व जुबेर चौधरी या कुंपणावर असलेल्या नगरसेवकांनी पुन्हा राष्टÑवादीतूनच निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला थोडेफार बळ आले आहे.